एक नाम, एक मत: दोहरा नाम होने पर कानूनी कार्रवाई
औरंगाबाद जिल्ह्यात मतदार यादीत दोन वेळा नाव असलेल्यांची संख्या मोठी आहे. प्रशासनाने याबाबत कारवाई करण्याचे ठरवले असून राजकीय पक्षांनाही याबाबत सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

औरंगाबाद: मतदाता यादीत नागरिकांनी आपले नाव दोन वेळा बदलत्या पत्त्या, लिंग किंवा इतर तपशीलांसह नोंदणी केल्यास त्यांनी आपले नाव फक्त एकच मतदारसंघात ठेवून सुधारणा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. उप जिल्हाधिकारी देवेंद्र काटके यावेळी उपस्थित होते.
मतदाता यादीतील दोन वेळा नाव असलेल्यांची यादी प्रशासन तपासून अतिरिक्त नावे रद्द करेल. परंतु त्यानंतरही दोन वेळा नाव आढळल्यास त्या मतदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला.
मतदार नोंदणी करताना त्यांच्या नावाची नोंदणी इतर मतदारसंघ, जिल्हा किंवा गाव आहे का, असा प्रश्न विचारला जातो. त्यावेळी नाही, असे उत्तर देण्यात येत असल्याने दोन वेळा नोंदणी होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही समस्या मुख्यत्वे शहरी मतदारसंघात जास्त आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून तक्रार होत आहे, असे स्वामी म्हणाले.
मंगळवारी प्रशासनाने राजकीय पक्षांशी बैठक घेऊन मतदार यादी संशोधन कार्यक्रमाची माहिती दिली. शहरातील मतदार यादीत ७० हजार दोन वेळा नावे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर राजकीय वर्तुळात एक लाखांच्या आसपास नावे दोन वेळा असल्याचा दावा आहे.
एकाला जास्त ठिकाणी नाव असल्यास प्रतिनिधीत्व कायद्याच्या कलम ३१ नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यात एक वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. नियम १८ नुसार दोन वेळा नाव असलेल्यांना नोटीस पाठवली जाईल. सुधारणा केली नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. तसेच लिंग बदलून नोंदणी केलेल्यांच्या घरी बीएलओ जाणार आहेत.
राजकीय पक्ष अनुपस्थित
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शिंदेसेनाचे प्रतिनिधी या बैठकीला अनुपस्थित राहिले. ईव्हीएम तपासणी आणि मतदार यादी संशोधनाच्या बैठकीला राजकीय पक्षांचे प्रतिनिधी येत नसल्याने नाराजी व्यक्त केली. नंतर मात्र टीका करतात, असे प्रशासनाने सांगितले.